Posts

Showing posts from March, 2020

हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज

Image
अलीकडे भारतीय हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज खरे ठरत आहेत ... चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील चार अन विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी म्हणजे 18 मार्च 2020 हवामान ढगाळ राहील ... पाऊसही पडेल असा अंदाज व्यक्त केला होता ...आणि तो शंभर टक्के खराही ठरला ...पावसाळ्यात असे अंदाज खरे ठरले तर किती बरं होईल असं एक मित्र म्हणाला ... पुढे तो मी सरकारी अधिकारीअसल्यानं खूप काही बोलला ... मी मात्र निमूटपणे त्याचे बोलणे ऐकून घेतले ... जणू काही त्याचे म्हणणे हवामानखत्यापर्यंतन मी पोहचा वे असाच त्याचा अविर्भाव होता ... असो पण आज दिवसभर लातूरचे वातावरण ढगाळ राहिलं ...अचानक साडे पाचला गडगडाट ... जोराचा वारा सुटला ...त्यासोबत पावसाचे थेंबही आले ...अन त्यासोबत अर्धे लातूर शहर अंधारात गेले ...सायंकाळी पावणे सहा पासून औसा रोडच्या दोन्ही भागातील वीज गुल आहे ... कॅडलच्या प्रकाशात फेसबुकच्या वालवर ...वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहतोय ... वीज पुरवठा कधी सुरू होणार याचा अंदाज मात्र नाही ...आता एकट्यालाच कॅडल डिनर घ्यावे लागेल असे दिसतंय 

शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ

Image
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज जयंती . दि. १७ मार्च १९१० रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा तत्कालिन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले. तथापि , महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलीच्या शैक्षणिक कार्याला गती मिळत गेल्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनुताई होत्या .अनुताई शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर ्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला. तेथे १९४७ ते ९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने आदिवासी आणि ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान आणि प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबा...

महान पराक्रमी मल्हारराव होळकर ...!!!

Image
आज मल्हारराव होळकर यांची जयंती. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारे हे मूळ पुरुष होतं . मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही. आज मल्हारराव होळकर यांची जयंती .१६ मार्च १६९३ रोजी मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे जवळचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. त्याकाळी तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनवत असे . त्यामुळं महापराक्रमी योद्धा म्हणूनच त्यांची ओळख करून दिली पाहिजे , पण काही इतिहासकारांनी त्यांच्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी त्यांच्याशी जोडून त्यांच्या पराक्रमास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला . तथापि , आता काही काही इतिसकारांनी मल्हारर...

याद राही मासूम रजा की ...!!!

Image
हिंदी और उर्दू कवी , महाभरात के पटकथा और सवांद लेखक राही मासूम रज़ाजी का निधन 15 मार्च 1992 मे हुवा .इसी वजहसे उनकी याद आई . इनका जन्म १ सितंबर, १९२५- को गजीपुर जिले के गंगौली गांव मे हुवा . और १५ मार्च १९९२ को उनका देहांत हुवा . और प्रारंभिक शिक्षा-दीक्षा गंगा किनारे गाजीपुर शहर के एक मुहल्ले में हुई थी. बचपन में पैर में पोलियो हो जाने के कारण उनकी पढ़ाई कुछ सालों के लिए छूट गयी, लेकिन इंटरमीडियट करने के बाद वह अलीगढ़ आ गये और यहीं से एम. ए .  करने के बाद उर्दू में `तिलिस्म-ए-होशरुबा' पर पीएच.डी. की . पीएच.डी. करने के बाद राही अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय, अलीगढ़ के उर्दू विभाग में प्राध्यापक हो गये और अलीगढ़ के ही एक मुहल्ले बदरबाग में रहने लगे. अलीगढ़ में रहते हुए ही राही ने अपने भीतर साम्यवादी दृष्टिकोण का विकास कर लिया था और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के वे सदस्य भी हो गए थे . अपने व्यक्तित्व के इस निर्माण-काल में वे बड़े ही उत्साह से साम्यवादी सिद्धान्तों के द्वारा समाज के पिछड़ेपन को दूर करना चाहते थे और इसके लिए वे सक्रिय प्रयत्न भी करते रहे थे. राही मासूम रज़ा १९६८ ...

अस्पृश्य बच्चे की जान बचाने के वजह से सावित्रीबाईने खुद की जान खतरे मे डाली ...!!!

Image
आज सारी दनिया केरोना व्हाराससे परेशान है . मेडिकल सायन्सने बहोत सारी उन्नत्ती की है . दवईयोकी खोज हो राही है . मेडिकल टेकनोलॉजी की खोज भी जोर पर है . दुनिया के बहोत सारे देश पुरानी बिमारीयोको जडसे उखाड फेकने मे कामयाब हो गये है . फीर भी कुछ बिमारियोके इलाज के लिए दवाईयोकी खोज बाकी है , उसमे केरोना का भी है . उस वजह से सारी दुनिया सदमे में आ गया है . जब दवाईयोकी खोज नही हुई थी उस वक्त प्लेग जैसे बिमारी से बिमार आदमी के संपर्क आनेसे हो जाता था , उस वक्त सावित्रीबाई फुले ने आठ किलोमीटरवर प्लेगसे बिमार विठ्ठल गायकवाड इस अस्पृश्य महार जाती के लाडके को खुद के पिठपर लेकर असप्ताल मे दाखिल किया था . उस बच्चेकी जान तो बच गई मगर , इसीकी वजहसे सावित्रीबाई फुले प्लेग की शिकार हुई और १० मार्च १८९७ को रात ९ बजे उनका देहांत हो गया . सावित्रीबाई फुले ३ जनवरी १८३१को महाराष्ट्र के सातारा जिले के नायगांव में जन्मी. ९ साल की उम्र में उनकी शादी हो गई, ज्योतिराव फुले से हुआ. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले के प्रेरणादायी साथ ने और उनसे मिली शिक्षा ने सावित्रबाई को महिला और समाज की मुक्ति के लिए लड़ने...

पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी लावला ...

Image
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान होतं .... सामाजिक परिवर्तनाच्या सर्वच क्षेत्रात अमिठ ठसा त्यांनी उमटवला ... अनेक आदर्श घालून दिले ...एकोणीसाव शतक म्हणजे देशातील अनेक घटना घडामोडीचा साक्षीदार असणारं शतक ... कर्मठ रूढी - परंपरा धरून ठेवण्याचा अठापीठा करणारे एकीकडं आणि या कालबाह्य रुढी - परंपरांना मूठमाती देऊन नव्या आधुनिक संकल्पनांवर आधारित नवा समाज घडवू पाहणारे  सामाजिक क्रांतिकारक एकीकडे असेच चित्र दिसते ... प्रामुख्यानं महिलांच्या बाबतीत तर भयानक परंपरा होत्या त्यांची कल्पनाच न केलेली बरी असही म्हटलं जाईल ... बाल विवाह , विधवा विवाहास बंदी , केशवपन , मुलींना शिक्षण देण्यास बंदी आशा कितीतरी बंधनांचा फास तिच्या गळ्या भोवती होता ... अशा परिस्थिती जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यासारख्या परंपरावादी शहरात समाज परिवर्तनाची पताका उचलून धरली ... पहिला विधुर विवाह जोतीराव फुले यांच्या प्रयत्नांनी आणि पुठाकारान 5 मार्च 1855 रोजी पुण्यात परमहंस सभेच्या वतीने विधुर देशमुख आणि विधवा पाटलीण यांचा पुनर्विवाह ला...

भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, उत्तम प्रशासक तंजावरचे व्यंकोजी राजे भोसले ...!!!

Image
व्यकोजीराजे भोसले यांनी दक्षिणेतील आत्ताच्या तमिळनाडूमध्ये तंजावर येथे 5 मार्च 16 76 रोजी राज्याभिषेक करून घेतला ... तेही छत्रपती झाले ... व्यंकोजी राजे हे शहाजीराजे भोसले यांचें पुत्र होते ... शहाजीराजे यांच्या पत्नी तुकाबाई यांचे व्यंकोजी पुत्र होते ... तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकले सावत्र बंधू होते ... व्यंकोजी राजे यांनी वडील शहाजीराजे भोसले यांच्या मृत्यूनंतर विजापूरकर आदिलशाही सुल्तानीतीतली त्यांची जहागीर आपल्या ताब्यात घेतली ... ते लेखक , नाटककार होते ... त्यांच्या नावावर 50 ग्रंथ ,12 नाटकं होती ... कुशल प्रशासक , संसंस्कृत भाषेबरोबरच तेलगू इतरही काही भाषा येत असत तर संस्कृत , तेलगू भाषेचे ते तज्ञ होते ... तसेच शूर , पराक्रमी आणि साहसी राजा म्हणूनही त्यांचा परिचय होता ... त्यांनी अनेक कलांचे संवर्धन तर केलेच तसेच संस्कृती भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले ... व्यंकोजी राजे भोसले यांनी त्यांच्या स्वराज्यात शेती आणि अर्थव्यस्थेला उभारी देण्याचं काम केलं ... त्यासाठी अनेक सुधारणा राबवल्या ... शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांनी नवे बांध बा...

कोरोनाचा विषाणू ...चिकन आणि गौरसमज दूर करण्याचा फंडा

Image
कोरोना विषाणू बाबत भारतात , महाराष्ट्रात आणि जगभर आफवांचे पेव फुटले आहे ... चिकन खाल्यानं कोरोना विषाणूची बाधा होते या आफवेमुळे तर चिकनच्या आणि अंड्यांच्या विक्री आणि वापरावर परिणाम झाला ... अनेकांच्या अंडी आणि चिकन खाणं सोडले ... या अफवा आणि गैरसमज दूर करण्यासाठी लातूरमधील पोल्ट्री फार्मर्स अँड चिकन सेंटर असोसिएशनच्या वतीनं काल लातूर मध्ये ३ मार्च २०२० बार्शी रोडवरील गरड गार्डन येथे चिकन फेस्टिवलचे आयोजन केले होत े ... लातूर जिल्ह्यात दररोज ३५ टन चिकनची विक्री होते ...तर या व्यवसायात २५ हजार व्यक्ती काम करतात ...हल्ली जिल्ह्यातील चिकन वक्री दररोज दहा टना पेक्षा खाली आली आहे ... या फेस्टिवल मध्ये ७५० किलो चिकन , ७५० किलो बिर्याणी आणि १५०० अंडी अशी व्यवस्था केली होती ..केवळ ५० रुपयांत एक प्लेट चिकन 65 , एक प्लेट बिर्याणी , एक बॉईल अँड देण्यात आलं होतं ... केवळ दोन तासात हे सगळं नागरिकांनी फस्त केलं ... गौसमज दूर करण्याचा हा फंडा खासच म्हणावा लागेल ...

होळकर घराण्यातील राजपुत्राच्या लग्नाच्या माध्यस्थीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची बारामतीत सभा .!!!

Image
इंदूरचे महाराजाधिराज सर राजराजेश्वर सवाई श्री . तुकोजीराव तृतीय होळकर तेरावे बहादुर यांनी कु . मन्सी मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याचे ठरविल्याने त्यांच्या विवाहास धनगर समाजाने विरोध केला ... यावरून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीत या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी धनगर समाजाची एक परिषद ४ मार्च १९२८ रोजी भरली होती ... या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांची बाजू उचलून धरली ...आणि या आंतर धर्मीय , आंतरराष्ट्रीय विवाहास पाठींबा दिला ... या परिषदेस बाबासाहेबांचे सहकारी रावसाहेब बोले हेही उपस्थित होते ... बाबासाहेबांच्या मध्यस्थीमुळे आणि पाठींब्यामुळे या परिषदेत धनगर समाजानेही या विवाहास पाठींबा जाहीर केला ... तुकोजीराव तृतीय होळकर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८९० रोजी महेश्वर येथे झाला ... होळकर घराण्यातील शिवाजीराव होळकर याचे ते पुत्र आणि उत्तराधिकारी होते ... ते ३१ जानेवारी १९०३ रोजी ते राजा झाले ... त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते ... त्यांचे शिक्षण इंदूर मधील डॉली कॉलेज मध्ये झाले ... तर आयसीसी चे शिक्षण त्यांनी डेहराडून येथे पूर्ण केले ...२७ मे १९७८ रोजी व...

या झाडाचं नाव काय ?

Image
हा झाडाचं नाव माहीत नाही ते नर्सरीत गच्च पानांनी बहरलेलं दिसलं म्हणून मी ते सावलीसाठी म्हणून लावलं ... तुरीच्या पानासारखी सारखी त्याची पानं आहेत ... फांद्यांही तशाच पण आता पानं कमी अन फुलं जास्त असं रुपडं झालंय ... पांढरी फुलं आल्या गेलेलेंच्या नजरा आकर्षित करतात अन प्रत्येकजण विचारतो या झाडाचं नाव काय ...? त्याचं उत्तर आमच्याकडं नसतं ... आपणाकडं असेल तर कृपया सांगावं ...!!!

सत्याग्रह माणसाच्या माणुसपणासाठी ...!!!

Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मार्च 1930 रोजी अस्पृश्य हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक समतेसाठी नाशिक येथील पंचवतील काळाराम मंदिर सत्याग्रहाची घोषणा केली ...या दिवशी प्रथम नाशिक शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषद घेऊन हा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला... सायंकाळी सभा होऊन दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 3 मार्च 1930 पासून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू करण्यात आला ... पहिल्या गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब 4 ऑक्ट ोबर 1930 रोजी मुंबईतून " व्हाइसरॉय ऑफ इंडिया " बोटीने लंडनला रवाना झाले ... त्यामुळे त्यांच्या अनुउपस्थितीत हा सत्याग्रह भाऊराव गायकवाड आणि अमृतराव रानखांबे यांनी नेटाने 12 ऑक्टोबर 1935 पर्यत चालवला ... स्पृश्यांचे मतपरिवर्तन होत नाही हे पाहून हा सत्याग्रह बाबासाहेबांनी थांबवला करण ..." बाबासाहेबांनी केलेला हा सर्वात मोठा ऐतिहासिक सत्याग्रह देवाचा उदोउदो करण्यासाठी नव्हता तर माणसाला माणूस बनवण्यासाठी उचलेलं पाऊलं होतं ..."

बाबासाहेब , अण्णाभाऊ आणि फकिरा ...!!!

Image
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांची १ मार्च १९५९ रोजी प्रसिद्ध केलेली           " फकिरा " ही कादंबरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आहे. आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघ भेदभाव मुक्त दिवस म्हणून साजरा करतं .बाबासाहेबांनी संविधानातील कलाम  १८ मध्ये यांचं तत्वाचा समावेश केला आहे . कोणत्याही करणावरून नागरिकांत भेदभाव केला जाणार नाही असं आश्वाशीत केलंय . असो बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणावर दिसतो , तसा त्यांच्या विचारांवर गौर्कि , मार्क्स यांच्या विचारांचीही प्रभाव होता . तथापि ,  कालांतरानं ते बाबासाहेबांच्या विचारानं भारावलेले दिसतात आणि त्या विचारांचा अंगीकार करून त्यासंकल्पनेचे साहित्य ते निर्माण करताना दिसतात . त्यांच्या कथा , कादंबऱ्या बरोबरच शाहिरी आणि कवितांतून ते आंबेडकरी विचारांची पेरणी करतात . " सापळा " आणि " वळण " या तसेच इतर  कथांतील पात्र बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली , त्या विचराबरहुकूम जीवन जगतांना अण्णाभाऊंनी समृद्धपणे उभी केली आहेत . तसेही अण्णाभाऊ १...