संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

   जयंतीनिमित्त 



 संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट 

                --- यशवंत कि.  भंडारे 

सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव.... त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही... मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं आहे... गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनीच ...गझलेच्या सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला...‘लाभले आम्हास भाग्य’  या त्यांच्या गझलनं मराठी माणसाच्या  मनात खास जागा निर्माण केलीय.., 

    त्यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी...  गझल यांचा आयुष्यभर मनापासून अध्ययन केलं ... गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला...त्यामुळं मराठी भाषिकांचे ते खरे खुरे ‘गझल सम्राट’  झाले ... विदर्भातील अमरावती  शहरात सुरेश भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी झाला... तिथेच ते लहानाचे मोठे झाले... वडील डॉक्टर असल्यान  घरची आर्थिक परिस्थीती चांगली  होती...  आईला कवितेची खूप आवड होती... यातूनच सुरेश भट कवितेकडं  वळले ...ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती... त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता... त्यांचं सर्व शिक्षण अमरावती येथे झालं ... बी.ए.च्या अंतिम वर्षात ते दोन वेळा नापास झाले ... हा कवितेवरील प्रेमाचाच परिणाम असावा ...पण १९५५  मध्ये  ते बी.ए. पास झाले... त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले... अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचं  कविता लेखन सुरू ठेवलं होतं...  ते जो कविता प्रकार  लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते... 

    
त्यांना उर्दू भाषेचही चांगलाच ज्ञान होतं.. कवितेमुळं सुरेश भट यांची महाराष्ट्राच्या कानाकोप-यात  ओळख होत  होती... त्यात हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढलं ... अन त्यांनी भटांच्या कविता, गझल यांना संगीतबद्ध केलं ...  तसे सुरेश भट आणखीच जास्त प्रसिद्धीस आले  त्यानंतर मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या.... सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. ..वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी शब्दबद्ध केली .... फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाही तर त्यांनी आपल्या गझलांमधून समाजाचं दु:ख मांडलं ... बदलत  राजकारन ... बदलता समाज...बदलती माणुसकी मांडली...त्यांच्या अनेक गझलांचा विद्यापीठायांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाआहे ... आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचं स्थान मिळालंआहे... त्यांच्या गझलांचे अनेक दर्दी आजही मोठ्या संख्येने आहेत ...त्यामुळं आजही त्यांच्या गझलांवर आधारित कार्यक्रमांना मोठी गर्दी होते ... त्यांची गझल  कोणत्याही एका जात , धर्म ,  वर्गाची प्रदेशाची नव्हती ती माणसावर  आणि त्याच्या जगण्यावर , त्याच्या दुःखावर आणि वेदनांवर हळुवार फुकर घालून त्याला लढण्याचं बाळ देणारी आहे ... असं म्हणतात अनेक साहित्यिकांनी त्यांच्या  गझलला मान्यता दिली  नव्हतीे पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान तर मिळवून दिलीचं त्याचबरोबर मराठी  गझलेला खूप उंचावर घेऊन गेले ...सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरती मर्यादीत ठेवली नाही ती सामान्यांपर्यंत नेलीच एवढेच नव्हेतर ती अनेकांना शिकवलीही ...आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक जण  प्रसिद्धीच्या  झोतात  आहेत ... 

    सुरेश भट यांची आणखी एक छुपी ओळख म्हणजे ते एक तडफदार पत्रकारही होते ...त्यांनी त्यांचं  एक साप्ताहिकही  सुरू केले होतं ... ज्यातून त्यांनी परखड लिखाणही  केलं ...समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं.... त्यावर ते बेधडकपणे लिहायचे...त्यांची व्यक्तीमत्व कलंदर होतं... असं अनेकदा बोललं गेलं आणि त्यात तथ्यही होतं ...त्याच्या गझलेन त्यांना मोठे मान ,  सन्मान , पुरस्कार, पैसा  आणि   प्रसिद्धी मिळाल्यावरही त्यांनी कधीही पैशांला फार महत्व दिलं नाही....त्यांनी मराठी  गझलला वाहून घेतलं , तिचा  प्रसार  प्रचार केला ...  ते लिहित गेले अन ते भरभरून लोकांना दित गेले ...या प्रवासात त्यांनी कधीही शिष्यांमध्ये दुजाभाव  केला नाही...जो येईल त्याला ते शिकवत गेले ... भरभरून देत गेले  ... देताना ते आपल्या झोळीत काहीच शिल्लक ठेवत नसत .... .सुरेश भटांनी मराठी गझल लिहू पाहणाऱ्या नवख्या  गझलकारांना गझलेच्या तंत्राची ,  व्याकरणाची  माहिती व्हावी म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिवून ती प्रसिद्ध केली होती ... नवोदिताना ही  पुस्तिका ते  स्वखर्चाने सोबत छानसं पत्र लिहून पाठवीत असत.... सुरेश भटांनी गझलेसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होत...आज एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे   की सुरेश भटांप्रमाण गझलेचं तंत्र जपणाराही  एक वर्ग तयार झाला आहे हे खूप महत्वाचं आहे ...

सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अविस्मरणीय  असं काम केलं आहे ... त्यांच्या गझल आणि  कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भीमराव पांचाळे  यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत... गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते....आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता... सुरेश भट यांना दोन मुलं आहेत ...त्यापैकी चितरंजन हेही वडीलांच्याच पावलावर पाऊल ठेवत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत... सुरेश भट यांचं  14  मार्च 2010 रोजी निधन झालं...  सुरेश भट हे मराठी गझलेस पडलेलं स्वप्नं होतं... ते मलमली तरण्या होतं.. जगण्यावर नि माणसाच्या संवेदनशी त्यांचं अतुट नातं होतं..

यशवंत कि. भंडारे 

दि. 15 एप्रिल 2025

  

             *

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?