Posts

Showing posts from December, 2019

अनुराधा पाटील यांची मानवतेच्या कळकळीची कविता - यशवंत भंडारे

Image
औरंगाबादच्या अनुराधा पाटील यांच्या “ कदाचित अजूनही ” या काव्यसंग्राहाची साहित्य अकादमीनं पुरस्कारासाठी निवड केली आहे. अनुराधा पाटील यांच्या कविता चिंतनात्मक आहेत. स्त्रियांच्या भावना अन् जाणीवा त्या हळुवारपणे मांडतात. त्यांच्या कविता स्वत:ची वाट शोधताना दिसतात. त्यांची कविता स्त्रियांच्या जीवनातील दु:खाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्याय शोधताना दिसते.अनुराधा पाटील यांचे 1981 ते 2005 या 24 वर्षांत चार कविता संग्रह प्रसिध्द झाले. त्या कविता संग्रहात 224 कवितांचा समावेश आहे.तर “ कदाचित अजूनही ” काव्यसंग्रहात 51 कविता आहेत. कवितांच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट शोधलीच त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रभाव   निर्णय केला. त्यांची प्रतिभा संपन्नता त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. त्याच प्रतिभेचा साहित्य अकादमीनं   2019 चा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यकृतींचा विचार करण्यात आला. ताम्र पत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश ...

कृतिशील समाजसुधारक : गाडगे महाराज

Image
गाडगे महाराज म्हटलं की हाती झाडू आणि सफाई असं चित्र डोळ्यासमोर येतं पण गाडगे महाराज यांनी जमिनीवरील सफाईबरोबरच माणसाच्या मनातील अंधश्रद्धा , कालबाह्य रूढी - परंपरा , चालीरीती , जातीभेद यांवर प्रहार करतानाच वैज्ञानिक दृष्टिकोनही समाजात रुजवण्याचा प्रयन्त केला ... त्यांची सवांद शैली श्रोत्यांच्या मनाला थेट साद घालणारी होती ...दैनंदिन व्यवहारातील वैगुण्यावर नेमकेपणानं बोट ठेऊन त्यातील खोटेपणा ते सहजपणे दाखवून देतं ...त्यामुळं त्यांचे अनेक भक्त झाले पण गाडगेबाबा आजच्या बजबजपुरीतील भोंदू बाबा सारखे नव्हते ... ते स्वतः चा बडेजावपणा वाढवून भक्तांना लुटणारे धर्माचा बाजार माडणाऱ्यापैकीही नव्हते ...उलट दगडातील देवा पेक्षा माणसातील देवाला अन देवळातील देवा पेक्षा चालत्याबोलत्या माणसाच्या कल्याणाचा ...त्याच्या सर्वांगीण विकासासाठी , त्याच्या सुखासाठी ,त्याच्या शिक्षण आणि आरोग्याससाठी काम करण्याचा आग्रह ते अधिक धरत असतं ...ते दरवर्षी पंढरपुरात आषाढी वारीला जात पण लोकांनी केलेली घाण साफ करत ...विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा त्यांनी स्वच्छतेत देव शिधला ...कुणास पाया पडू दिले नाह...

तत्वज्ञ अभिनेता : डॉ.श्रीराम लागू

Image
अभिनेता श्रीराम लागू यांचं आज (दिनांक 17 डिसेंबर, 2019) वृध्दापकाळानं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.त्यांचं पार्थिव दिनानाथ मंगेशकर  रुग्णालयात उद्या (दि.18 डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी आज धडकली अन् एका खऱ्या नटसम्राटाला श्वासोश्वासाच्या जंजाळ्यातून निसर्गानं मुक्त केलं. विज्ञानावर नितांत निष्ठा ठेवून त्या बरहुकुम जगलेल्या आणि अंधश्रध्देवर प्रहार करत विवेकनिष्ठ समाज घडावा म्हणून प्रयत्न करणारा माणूस आपल्यातून आज गेला आहे….. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली…..!!! पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना डॉ. लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भालबा केळकर यांच्यासारख्या  समविचारी वरिष्ठ स्नेही समवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरु केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्षे कामही केलं. त्यानंतर कॅनडा आणि इंगलंड येथे पुढील प्रशिक्षण घेतलं. 1960 च्या दशकात डॉ.लागू य...

श्री विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

Image
संवेदनशील उत्कृष्ट छायाचित्रकार माझे मोठे भाऊ विजय होकर्णे यांचा वाढदिवस श्री विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाने साजरा केला. विशेष म्हणजे विभागीय माहित ी कार्यालय लातूर चे उपसंचालक मा. यशवंत भंडारे प्रजावाणी चे संपादक शंतनू डोईफोडे आणि प्रेरणा क्लासेस चे उमाकांत जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भंडारे सरांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पुणे येथे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय

Image
आताचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. १८५४ मध्ये १६ डिसेंबर रोजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची, गिंडी ( १७९४) व आय. आय. टी , रुरकी ( १८४७) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना CoEPians असे म्हण्तात. भारतीय  उपखंडातील तांत्रिक गरजा भागवण्यासाठी १८५४ मध्ये इंग्रजांनी 'Poona Engineering Class and Mechanical School' या नावाने हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले होते. त्यावेळी भारतात इमारती, पूल, धरणं , कालवे, रेल्वेवे इत्यादी सार्वजनिक सोयींच्या बांधकामासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हेच या महाविद्यालयाचे प्रमुख कार्य होते. नंतर काही काळासाठी महाविद्यालयाचे नाव 'Poona Civil Engineering College' असे करण्यात आले होते. शेवटी १९११ मध्ये या महाविद्यालयाचे 'College of Engineering, Poona' असे नामकरण करन्यात आले .

विजय दिवस : भारतीय सैन्याचा शौर्य दिन

Image
विजय दिवस: 1971 का भारत-पाक युद्ध मानवीय इतिहास में अनोखा क्यों है? विजय दिवस न केवल भारत की पाक पर 1971 में शानदार जीत याद दिलाता है बल्कि यह बांग्लादेश के जन्म की कहानी भी कहता है। 16 दिसंबर 1971 को 93,000 पाकिस्तानी सैनिकों ने सफेद झंडा उठा कर भारतीय सेना के समक्ष आत्मसमर्पण कर दिया भारत हरेक साल 16 दिसम्बर को ‘विजय दिवस’ और बांग्लादेश इसको ही उच्चारण के थोड़े अंतर से ‘बिजॉय दिबोस’ मनाता है। यह बीसवीं सदी के उत्तरार्ध में हुए सर्वाधिक भीषण संग्राम की स्मृति में मनाया जाता है। 1971 में इसी दिन पाकिस्तान की सेना ने तत्कालीन पूर्वी पाकिस्तान के इलाके में भारतीय सेना और बांग्लादेशी स्वतंत्रता सेनानियों-मुक्तिवाहिनी-संयुक्त कमान के समक्ष आत्मसमर्पण कर दिया था। मुक्ति की इस लड़ाई में भारतीय सेना के जवान और मुक्तिवाहिनी के लड़ाके कंधा से कंधा मिला कर लड़े थे। भारतीय और बांग्लादेशियों की शहादत से प्रचुर परिमाण में निकला लहू पद्मा और यमुना तथा बांग्लादेश के पार बहने वाली बेशुमार नदियों की माटी-पानी के साथ मिलकर गंगा-ब्रह्मपुत्र नदी के बेसिन में विसर्जित हो गया था। 1971, भ...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम

Image
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ( मुंबई ) च्या औरंगाबाद येथील सर्व शैक्षणिक संस्थांच्या विद्यमाने बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना मी ... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे मार्गदर्शक गुरू औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे सर होते ... कार्यक्रमास पी ई एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अभिजित वाडेकर , डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे , मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस डी. राठोड , मिलिंद मल्टीपरपज हयस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए . पी . गोलकोंडा , मातोश्री रमाबाई आंबेडकर हयस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री घोबले यांच्या सह मोठया प्रमाणात प्राध्यापक , शिक्षक ,विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी , नागरिक , मध्यम प्रतिनिधी उपस्थित होते ...

लातूर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आस्था व लेखा प्रशिक्षण

Image
लातूर येथील  विभागीय माहिती  कार्यालयातर्फे विभातील लातूर ,उस्मानाबाद ,नांदेड आणि हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या आस्था आणि लेखा विषयक दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षणाची आज सुरुवात झाली . प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे माहिती उपसंचालक यशवन्त भंडारे हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आणि जिल्हा कोषागार अधिकारी राधकीसन राऊत उपस्थित होते . यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी सर्वश्री सुनील सोनटक्के ( लातूर ) , अरुण सूर्यवंशी ( हिंगोली ) , मनोज सानप ( उस्मानाबाद ) , सहायक संचालक तथा नांदेडच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास हे उपस्थित होते.