Posts

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाष्यकार प्रा अविनाश डोळस

Image
प्रा. अविनाश डोळस सर यांचं घर म्हणजे अनेकांच्या मार्गदर्शनाच हक्काचं ठिकाण ... अनेक विषयांचं त्यांनी नेमकेपणानं केलेलं विश्लेषण समाधान करून जात असे... या गप्पांचा फड पूर्वी त्यांच्या छावणीतील घरी जमत असे नंतर सरांनी नंदनवन कॉलनीत बांगला बांधला अन गप्पांचा फड मग येथे रंगू लागला ...प्रा अविनाश डोळस यांचा आज जन्म दिवस ... 11 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे येथे झाला ... प्रा. अविनाश डोळस यांनी जातीय, धार्मिक अभिनिवेश टोक गाठत असताना वंचित, वंचित , बहुजनांच्या हक्कांची जाणीव सवर्णामध्ये करून देणारी समन्वयवादी भूमिका घेत उपेक्षितांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा ठाव घेण्याचं काम सातत्यानं केलं ... डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची नितांत निष्ठा होती ... याच विचारांची सोबत करत उपेक्षितांच्या चळवळीला आकार देण्याचं काम ते करत असत ... सामाजिक चळवळीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांची विताकद देताना ती चळवळ कार्यप्रवण करण्यासाठी समविचारी चळवळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कसे जात येईल या...

नांदेड येथील ज्येष्ठ संपादक डॉ रवींद्र रसाळ यांचे निधन

Image
नांदेड येथील दै.गोदातीर समाचार चे माजी संपादक डाॅ.रविन्द्र रसाळ यांचे आज ( दि.8 डिसेंबर 2019 ) दुपारी तीन च्या सुमारास परभणी येथे ह्रदयविकाराने निधन झाले... ते पंच्याहात्तर वर्षांचे होते... नांदेड आणि मराठवाड्याच्या पत्रकारितेत दैनिक गोदातीर समाचार हे जुने आणि परिचित दैनिक... गोदातीर च्या स्थापनेपासून त्यांनी पत्रकारितेत आपले योगदान दिले... सायकलवर फिरून बातम्या गोळा करणे, वार्ताहरांची प्रशिक्षण शिबिरे घेणे, बा तम्यांवर संपादकीय संस्कार करणे याबरोबरच बातमी, अग्रलेख, वितरण अशा सर्वच बाबतीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता... विशेष म्हणजे ते विज्ञानिक लेखनास प्राधान्य देत असत ... भूकंपावर त्यांनी संशोधन केलं होतं ... काश्मीर प्रश्नावर त्यांनी काही अग्रलेख लिहिले... मराठवाड्यातील पत्रकारिता, साहित्यिक पिढी घडविण्यात दै गोदतीरचा मोठा वाटा होता... माझ्या महाविद्यालयीन काळात लिहिल्या कविता , इतर लेखनास दै गोदतीर म्हणजे हक्काच व्यासपीठ होतं ... त्याकाळी दै प्रजावणी आणि दै गोदतीर म्हणजेच वृत्तपत्र असं काहीसं म्हटलं जातं असे ... दै मराठवाडा बिलोली , कुंडलवाडी ला दुसऱ्या...

नवनिर्मितीकार : के .शिवराम कारंथ

Image
यक्षगान कलाकार , थोर साहित्यिक काटा शिवराम कारंथ यांची आज पुण्यतिथी ... त्यांचा मृत्यू ९ डिसेम्बर १९९७ रोजी उडपी येथे झाला ...तर जन्म १० ऑक्टोबर १९०२ रोजी कोटा येथे झाला ... कन्नड साहित्यिक ,परायावर्णवादी ,इतिहास प्रेमी ,नाटककार ,कादंबरीकार अशी ओळख असणारे शिवरामजी कर्नाटकातील बहुआयामी व्यक्तिमत्व होतं ... त्यांनी ४७ कादंबऱ्या ,३१ नाटकं लिहिली ... शिवराम कारंथ यांचं नाव केवळ कन्नडच नव्हे, तर भारतीय साहित्यातही अतिशय आदरानं घेतलं जातं... त ्यांच्या निवडक पुस्तकांचा अनुवाद मराठीही झाला आहे... ‘चोमन दुडी’ या त्यांच्या कादंबरीचा ‘चोमा महार’ या नावान मराठी भाषेत अनुवाद कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे... हा अनुवाद श्यामलता काकडे यांनी केला आहे ... कन्नड भाषेत कसदार साहित्यनिर्मिती करणारे साहित्यिक के. शिवराम कारंथ हे भारतीय साहित्यविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होतं ... ‘द व्हिस्परिंग अर्थ’ हा त्यांच्याच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद मराठीत माणूस आणि माती या नावान करण्यात आला ... ही कादंबरी माणूस आणि माती यांच्यातील नातं अधोरेखित करते ... या कादंबरीत कर्नाटकातील एका शेतकऱ...

विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून रुजू : मनःपूर्वक अभिनंदन

Image
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली आहे ... अजपासून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे ... 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते...भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता... 2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते... मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे असलेले विकास खारगे यांचा जन्म 17 मार्च 1968 चा आहे ... त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीच्या शाहू नगरपरिषदेच्या शाळेत तसेच व्यंकटराव माध्यमिक शाळेत तसेच कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले... पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीमधून त्यांनी बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली... तसेच युकेच्या युनर्व्हिसिटी ऑफ ससेक्समधून एम.ए. (गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट) पूर्ण केले... *प्रशासनाचा गाढा अनुभव* चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अ...

स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान - यशवंत भंडारे, लातूर

Image
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे साधन आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे. मानवी साधन सामग्रीचा वापर सुयोग्य पध्दतीने करावयाचा असेल तर जात आणि धर्माच्या साखळ दंडानी जखडून ठेवलेल्या मानवी साधन सामग्रीला मुक्त केले पाहिजे, धार्मिक-सांस्कृतिक साखळ दंड उद्ध्वस्त केले पाहिजे. कायद्यापुढील समानतेच्या सुत्रांची काटेकोर अंमलबजावणी करुन देशाच्या समृध्दतेला गती दिली गेली पाहिजे. सामाजिक समतेबरोबरच संधीची समानता निर्माण केली पाहिजे. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, संधीची समानताही आणावी लागेल. असा आग्रह धरुन केवळ नि केवळ देशाचा विचार करणाऱ्या आधुनिक नेत्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर अग्रणी होते. भारत ही मह...

लोककलेतील प्रबोधनाचा पाईक :- विठ्ठल उमप

Image
लोककलाकार विठ्ठल उमप यांनी लोककलेतील नृत्य आणि सादरीकरणासह गायकीचे विविध प्रकार अतिशय उच्च दर्जाचे सादर करुन मराठी माणसांच्या मनावर राज्य केलं. उमपांनी अनेक  कोळी गीतं आणि भीम गीतं रचली आणि ती अतिशय उत्तमपणे गायलीही. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या लोकनाटयानं अनेकांना भूरळं घातली होती. त्याचे प्रयोग देशभर अन् विदेशातही झाले. सुमारे 500 च्या वर या लोकनाटयाचे प्रयोग झाले. शाहीर, लोकगायक आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उमप यांना निसर्गानं भिन्न शैलीचा गळा दिला होता. विविध गायन प्रकारात ते लिलया वावरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांचं असिम प्रेम तर होतचं त्याचबरोबर वैचारिक बांधिलकीही होती. नागपूर येथील सुप्रसिध्द दीक्षाभूमीवर कार्यक्रम सुरु असतानाच स्टेजवरच त्यांना ह्दय विकाराचा तीव्र धक्का आला. तथागत बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केल्यानंतर उपस्थितांना  “जयभीम”  ची घोषणा देत अभिवादन करतानाच ते कोसळले. उपचारा दरम्यान म्हणजे शनिवार 26 नोव्हेंबर  2010 रोजी म्हणजे 27 नोव्हेंबर 2010 रोजी पहाटे एक वाजून 40 मिनिंटांनी त्यांचं ...

भारतीय पुरातत्त्वचे जनक : सर अलेक्झांडर कनिघम

Image
सर अलेक्झांडर कनिघम ( Sir Alexander Cunningham) या महान अभियंत्यानेच भारतातील अनेक बौद्ध स्थळांचा आणि काही बुध्द लेण्यांचा शोध लावला... सारनाथ, बुध्द गया, कुशीनारा,नालंदा, तक्षशिला आदी भूगर्भात दडलेला बौद्ध कालीन इतिहास यांनी शोधून काढला ... आणि जगाला पटवून दिले की भारतभूमी ही खरच *बुध्दभूमी* होती , असं म्हटलं जातं ... भारतात बौद्ध धम्माच्या पूर्जीवनाचा विचार करता अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु सर अलेक्झांडर कनिंघम यांचं नावं फारस कोणी घेत नाही... तथापि, भारतमधील महत्वपूर्ण बौद्ध स्थळं शोधून काढन्यात त्यांचं नावं प्राधान्यानं घ्यावं लागेल ... लुम्बिनी,सारनाथ, साँची, कुशीनगर, तक्षशिला, नालंदा हा सर्व भारतातील प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा भूगर्भात गडप झाला होता , त्यांनी तो उत्खनन करून शोधून काढला ... सर अलेक्झांडर कनिंघम हे ब्रिटीश सैन्यामध्ये इंजिनीयर होते... त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये २३ जानेवारी १८२३ रोजी झाला होता .. . वयाच्या २१ व्या वर्षी त्यांची इंजिनीयर म्हणून वाराणसीला नियुक्ती झाली... वाराणसी शहराबाहेर सारनाथ हे स्थळं शांत आणि कल्लोळापासून दूर होतं ...तिथे फेर...

मराठवाड्यातील बौद्ध धम्माचा संदर्भ आणि जागतिक धम्म परिषद औरंगाबाद २०१९

पहा :  http://bit.ly/35PqqL7

ग . त्र्यं . माडखोलकर यांना विनम्र अभिवादन .... !!!

Image
मराठी साहित्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ,लेखक ,कवी , पत्रकार आणि समीक्षक आशा विविध अंगी लेखनान मराठी भाषा समृद्ध करणारे गजानन त्र्यंबक माडखोलकर यांची आज पुण्यतिथी... प्रथम त्यांना अभिवादन ...!!! आपल्या खास भाषा वैभवामुळे माडखोलकर मराठी जगतात परिचित होते ...मी महाविद्यालयात असताना त्याचं मिळेल तेव्हडे साहित्य वाचलं ... त्यांच्या लयदार , भरदार आणि प्रसंगाच चित्रण खास पद्धतीनं करण्याच्या शैलीमुळ ते त्यांच्या लेखनाच्या प्रे मात वाचकांना पाडत असतं ...मराठी आणि स्वस्कृत कविता करत - करत त्यांनी मराठी साहित्यात विविध साहित्य प्रकार हाताळले ... ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते ... रविकिरण मंडळाने १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या " उषा " या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या ... बेळगाव येथे १९४६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ... कर्नाटकातील या संमेलनात त्यांनी कर्नाटकीच्या नाकावर टिचून मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा असा प्रथमच ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला... इटली आणि आर्यलँडच्या इतियाचा त्यांनी अभ्यास केला ...

महात्मा फुले यांना : कोटी कोटी नमन ...!!!

Image
आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला आहे ... त्याच्या परिवर्तनाचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले ... भारतात सर्वाधिक समाजसुधारक महाराष्ट्रातील होते ... देशाला समाजसुधारणेची प्रेरणाच मुळात महाराष्ट्रातील समाज सुधारकांची आहे ... त्यांचा हा वारसा त्यांच्या ग्रंथांद्वारे आजही आपणास मार्गदर्शक ठरतो आहे ... या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे अग्रगण्य आहेत . .. ते खऱ्या अर्थानं क्रांतीसुर्य होतं ... त्यांची दुसरी ओळख मराठी भाषेतील लेखक , कवी , नाटककार , उद्योजक , शास्त्रज्ञ शेतकरी , विचारवंत , बांधकाम व्यावसायिक , शिक्षण तज्ज्ञ , स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे पाहिले नेते , स्पृश्यशाचे उद्धारक अश्या कितीतरी विशेषणांनी करून देता येईल ... " सत्यशोधक समाज " संस्थेची स्थापना करून त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली ... महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्व प्रथम स्त्री आणि अस्पृशांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली... जनतेने त्यांना मुंबईतील एका मोठ्या समारंभ...