Posts

Showing posts from February, 2020

संविधानानुसार आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा ही हार्दिक शुभेच्छा ...!!!

Image
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस सर चंद्रशेखर व्यंकट रमण अर्थात सी .व्ही .रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी   # RamanEfect   चा शोध लावल्याबद्दल हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित करण्यात आला आहे ... यामागे मुख्य हेतू प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हा आहे ... दर वर्षी त्या त्या वर्षासाठी एक थीम ( घोष वाक्य ) भारत सरकार जाहीर करतं ... यावर्षीची म्हणजे २०२० ची थीम " विज्ञानात   महिला " ( Women in Science ) अशी आहे .रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी  # RamanEffect  चा शोध लावला आणि अगदी दिनच वर्षांनी म्हणजे १९३० मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला .विज्ञानातील संशोधनासाठी भारतातील संशोधकास मिळालेला हा पहिला नोबेल पुरस्कार होता . आपणा सर्वांना भारताचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात परंतु आपणास हे फारसं माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक म...

मराठी ज्ञान भाषा व्हावी : यशवंत भंडारे

Image
कुसुमाग्रज यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मला अनेक वेळा मिळाली .मी नाशिक येथील दै सकाळ मध्ये असताना सुटीच्या दिवशी कुसुमाग्रज यांच्या घरी जात असे .थोडावेळ चर्चा करून निरोप घेत असे . मराठवाडा आणि मराठवड्याडतील साहित्यिक , साहित्य ,सामाजिक चळवळी हा प्रामुख्यानं चर्चेचा विषय असे .तर कधी त्यांच्याकडून सकाळसाठी एखाद्या विषयावरची प्रतिक्रिया अशाही निमित्तानं त्यांची भेट घेतली होती .या भेटीत त्यांच्याकडून बरेचसे शिकावयास मिळाले . लातूर येथील विभागीय माहिती कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय,श्री. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कवयीत्री सौ.शैलजा कारंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. राजाभाऊ होळकुंदे, प्रा. शिवप्रकाश डोंगरे ,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते. भाषेची अवस्था वाईट नाही तर आपल्या अकलनाची अवस्था वाईट झाली आहे....

मुद्रण कला विचारांची वाहक

Image
मुद्रण यंत्राचा शोध लावणाऱ्या योहान गुटनबर्ग यांच्या जन्मदिनी २४ फेब्रुवारीला म्हणजे आज जागतिक मुद्रण दिन साजरा केला जातो . मानवी इतिहासात मुद्रनाच्या शोधामुळे विचार प्रसाराला गती मिळाली . म्हणून या दिसास इतिहासात खूप मोठे महत्व आहे .कालौघात मुद्रण कलेतील शोधामुळं या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत .आणि आणखी होत राहतील ... मुद्रण अर्थात छपाईचा इतिहास १३०० ते १४०० वर्षे जुना आहे. चिनी लोकांना छपाईची कला अवगत होती. चीन मध्ये दगड , लाकूड यावर कोरलेल्या मजकुरावर शाई लावून त्याचा ठसा कागदावर घेतला जात असे. प्रामुख्यानं बुद्धाच्या विचारांची माहिती त्यात असे .म्हणजे बौद्ध धर्मियांची मुद्रण कलेच्या वाढीत आणि विकासात महत्वाची भूमिका होती . कागदावर ठसा उमटवरून एकाच मजकुराच्या किंवा चित्राच्या अनेक प्रति तयार करणे याला मुद्रण (प्रिटिंग) म्हटले जाते. योहान गुटेनबर्ग यांनी लावलेल्या शोधामुळे मुद्रणाची क्रांती झाली. छपाईसाठी टिकाऊ सुटी अक्षरे (मुव्हेबल टाइप) मोठ्या संख्येने तयार करणे, तसेच प्रत्येक अक्षर एकसारखे दिसायला असणे महत्त्वाचे होते. मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी एका विशिष्...

फ्लॉवर ऑफ व्हॅली

Image
ही छायाचित्र काश्मीर किंवा विदेशातील नाहीत ...ही छायाचित्र औरंगाबाद येथील बौद्ध लेणी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आहेत ... दोन महिन्यांपूर्वी हा परिसर हिरवाईनं नटलेला हिता ... आता त्यानं आशा गच्च फुलांचं रुपडं धारण केलय ... सकाळी मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी एव्हीनिंग वॉक साठी या परिसरात येणाऱ्यासाठी तर हे खास ठिकाण झालंय ... हे औरंगाबाद शहरातील ऑक्सीजन हब आहे असं म्हटल्यास हरकत नाही ... त्यात येथील लेण्याही मोहात पडणाऱ्या आहेत ...गोगाबा बा टेकडी आणि लेणीच्या वरची टेकडी आता ट्रेकरनाही खुणावत आहे ... तरुण , तरुणी , पुरुष - महिला , मुलं - मुली असे अनेक जण शनिवारी आणि रविवारी या टेकड्यावर मोठया प्रमाणात चढाई करताना दिसतात ... पूर्वी पर्यटक फारशी या लेण्यांना भेट देत नसतं हल्ली त्यांची संख्या वाढते आहे ... त्यामुळं लेणी परिसरात खाद्य पदार्थही मिळू लागले आहेत ... मग एकदा तुम्हीही भेट द्याच ... अतुल्य भारत ...!!!

बुद्धीवंत महाराजांना विनम्र प्रणाम .... जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....

Image
थोर संघटक , कष्टाळू , पराक्रमी , युद्धशास्त्र निपुण , शीलवान , विनयशील , महान मुत्सद्दी , कुळवाडी भूषण , शेतकऱ्यांचा कैवारी , किर्तीवंत , बुद्धिवंत अशा कितीतरी विशेषणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गैरव केला तरी हे शब्द अपुरे आहेत ....  त्यांच्या कर्तृत्वाचा गैरव जगातील अनेक महान इतिहासकार... युद्धतज्ञ ... विचारवंतांनी विविध अंगी स्ववरूपात केलं आहे....त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र प्रणाम ... त्यापैकी काहींची नोंद मी येथे देत आहे... 1) इंग्रज इतिहासकार ऑर्म ...."   सेनानायक या नात्याने त्यांनी आपल्या सैन्याच्या अग्रभागी राहून जितकी भूमी पायाखाली घेतली तितकी तितकी कोणत्याही सेनानायकाने केव्हाही घेतली नाही ... कोणत्याही संकटात मग ते कितीही भयंकर आणि अचानक आलेले असो ... त्यांनी आपले धैर्य यत्किंचितही ढळू दिले नाही ... अशावेळी मनामध्ये तात्काळ अचूक निर्णय घेऊन संकटाचा बिनदिक्कत सामना केला ... त्यांचे सर्वश्रष्ट अधिकारीही त्यांच्या सर्वगुणसंपन्नते पुढं माना तुकवीत ...छातीचा कोट करून उघड उघड साहस करण्यात त्यांच्या तलवारीवर मात करणारी तलवार आलम दुनियेत आढळ...

प्रेमळ आई -मानी स्त्री : भिमाई

Image
भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई   आणि   सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या . त्यांचे वडील धर्मा   मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत आणि नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार मेजर   होते . भीमाबाई सकपाळ ( आंबेडकर ) यांचं टोपणनाव भीमाई होतं . त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १८ ५४ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेभे   येथे झाला ,  तर   त्यांचा मृत्यू १८९६ मध्ये झाला . १८६७ मध्ये वयाच्या तेराव्या   वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला .    १८६६   मध्ये रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले . भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते आणि ते इंग्रजी सैन्यात सुभेदार   मेजर या पदावर होते . रामजी आणि भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती . त्यापैकी ...