Posts

Showing posts from July, 2015

अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांतील नायक

Image
अण्णाभाऊ साठे यांची आज ९५ वी जयंती आहे. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठ काम केलं आहे. अण्णाभाऊ यांनी तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांनी १९४२ मध्ये ‘वारणेच्या खोऱ्यात’ ही पहिली कादंबरी लिहून आपल्या कादंबरी लेखनाची जोरकस सुरवात केली. पुढे ते सातत्याने लिहित राहिले. अण्णाभाऊ जातीय, वर्गीय, हितसंबंधाच्या पूर्णतः विरोधात होते. त्यांनी बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता या विचारधारेवर आधारित आपला वाड़मयीन दृष्टीकोन विकसित केला. समाजातील अन्याय, शोषण, विषमता, उच-निचता, उपेक्षितांची पिळवणूक, स्त्रियांची केली जाणारी पिळवणूक या आणि समक्ष विषयांचा आपल्या लेखनातून सातत्याने विरोध केला. एकीकडे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांची कास धरत दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेऊन दलित शोषितांची प्रश्न जगाच्या समोर आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांचा विचार करताना त्या मनोरंजनाबरोबरच समाजचं वास्तवही प्रखरपणे मांडतातच त्याचबरोब...

कलामांचा संवाद विद्यार्थ्यांशी....!

Image
ही आठवण २००२ मधील. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे १७ जुलै २००२ रोजी भारताचे अकरावे राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच मुंबई भेटीस आले होते. या भेटीत आपणास शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधावयाचा आहे, असा संदेशही त्यांनी राज्य शासनाला कळवला होता. त्यानुसार मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा शालेय विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात काम करीत असे. माझ्याकडे शालेय शिक्षण विभागाचं प्रसिद्धीचं काम होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळं मी षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच तासभर अगोदर पोहचलो होतो.  अतिमहत्वाच्या व्यक्ती कार्यक्रमस्थळी जात असताना त्यांच्यासाठी वेगळ्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामुळं कलाम व्यासपीठावर सभागृहातून न जाता वेगळ्या रस्त्याने उपस्थित राहतील असं सगळ्यांना वाटत होतं. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा किलबिलाट नेहमी प्रमाणे सुरु होता. इतक्यात महामहीम राष्ट्रपती ड...

भेटी लागे जीवा...!

Image
  बाळाला आईची ओढ, पाडसाला गाईची ओढ, जशी असते तशीच ओढ वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची लागली असते. २०-२५ दिवस वारीतून चालत येऊन विठ्ठुरायाचं दर्शन घेण्यास असुसूल मन पंढरपूर जसं जसं जवळ येऊ लागतं तेवढी पांडुरंगाच्या भेटीची तीव्रता वाढू लागते. संतापासून सामान्य वारकऱ्यांनी विठ्ठलाला वेगवेगळया रूपात पाहिलं आहे. तो कधी त्यांचा जीवाभावाचा सखा होतो, कधी श्रांतांची साऊली होतो, कधी दीनांची माऊली होतो, त्यामुळंच की काय महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेचं विठ्ठलाशी अतूट नातं जडलं आहे. दु:खी मनातील भावनांना वाट मोकळी करून देणारा तो वारकऱ्यांचा सखा, सोबती आहे. म्हणून वारकरी अतिशय विश्वासानं विठ्ठलाशी संवाद साधत स्वतःच दुःख त्याला सांगून मनावरील भार कमी करत असतात. त्याच्याशी हितगूज करत असतात. पंढरीची वारी आणि वारकऱ्यांचा समाज-व्यवहार हा अनेकांच्या जिज्ञासेचा, संशोधनाचा, अपार श्रद्धेचा संशोधनाचा विषय होत आला आहे. म्हणून काहींना विठ्ठल ही ज्ञानमूर्ती वाटते. तर काहींना ते ज्ञानरूप, तत्वरूप आणि भावरुपीही असल्याचं जाणवत. म्हणून तो अनेकांना आपल्या प्रेमात पडताना दिसून येतो. त्याच्यावरी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्याच्या शिक्षणातील योगदान

Image
‘‘ औरंगाबादचे कॉलेज मला एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. यावर्षी एक लाख रुपयांची तूट येईल असे समजले आहे. हा आकडा धक्का देणारा आहे. दिल्लीत उस्मानीया विद्यापीठाचे उपकुलकगुरु यांची व माझी भेट झाली. भेटीत आपल्या कॉलेजला मदत करण्याच्या बाबतीत ते मला उत्साही दिसले नाहीत. उलट औरंगाबादहून दुसऱ्या ठिकाणी कॉलेज हलवावे लागेल अशीच त्यांनी सूचना केली. आता आपण ते सुरु केले आहे. तेव्हा ते पूर्णत्वास नेले पाहिजे . ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाच्या उभारणी मागची तळमळ आणि येणाऱ्या आडचणींबाबत असलेली चिंता त्यांनी 14 नोव्हेंबर 1950 रोजी दादासाहेब गायकवाड यांना दिल्लीतून पत्र लिहुन व्यक्त केली होती.             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, ...