Posts

महिला - मुलांना सुरक्षितेसाठी कायद्याचे सुरक्षा कवच : भंडारे

Image
             लातूर,दि.3:-महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे , त्यांना निर्भेळपणे सर्वत्र वावरता यावे , आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रामुख्याने डिजिटल तंत्रज्ञान , सायबर  सुरक्षा त्यांना मिळावी ,त्यांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होऊ नये आदी कारणासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध कायदे केले आहेत .त्यामुळे महिला आणि मुलांना कायद्याचे सुरक्षा कवचच प्राप्त झाले आहे ,असे प्रतिसाद येथील  विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केल.          जिल्हा पोलिस दल, कॉक्सीट कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विदयामाने कॉक्सीट कॉलेजमध्ये आयोजित  “सायबर सेफ वूमन” बाबतच्या कार्यशाळेत श्री . भंडारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  महापौर विक्रांत गोजमगुंडे, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.एम.आर. पाटील,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, बाल विकास समितीच्या अध्यक्ष उमा व्यास, कॉक्सीटचे प्राचार्य नि...

समाजसुधारक सावित्रीबाई फुले

Image
जयंती विशेष लेख.. सावित्रीबाई जोतीराव फुले म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, भारतातील पहिल्या शिक्षिका, समाज सुधारक आणि कवयित्री अशी त्यांची ओळख दिली जाऊ शकते. त्यांचे कार्य आणि कृर्तृत्व शब्दातीत आहे. 3जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे आणि सत्यवती नेवसे हे त्यांचे वडील-आई .थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या खाद्याला खांदा लावून त्यांनी स्त्री शिक्षण तसेच एकूणच शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतीकारक कामं केलं. समाजसुधारणेच्या कामात जोतीराव फुले यांना मोलाची साथ दिली एवढेच नव्हे तर त्यांच्या कार्यात त्या सक्रीय सहभागी झाल्या होत्या. पत्नी ही केवळ अर्धअंगिणी म्हणून ओळखली जाते पण   सावित्रीबाई फुले या पहिल्या खऱ्या सर्वार्थानं अर्धांगिणी होत्या. त्या अधुनिक मराठी काव्य लेखनाच्या अग्रदूतही होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडयात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. त्या शाळेत त्यांनी पहिली शिक्षिका म्हणून कामास सुरुवात केली. कर्मट सामाजिक परंपरांनी ग्रस्...

पीडित महिलेची ओळख माध्यमांनी उघड करू नये : यशवंत भंडारे

Image
लातूर दि 31 : प्रसार माध्यमे ही समाजाचा आरसा असून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी लेखनीचा वापर करावा, त्यांना संरक्षण मिळेल अशी भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती उमा व्यास यांनी केले. येथील विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांसाठी महिला सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे होते. यावेळी विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, सहायक संचालक मीरा ढास हे होते. यावेळी श्रीमती व्यास म्हणाल्या, महिला सुरक्षा हा चिंतेबरोबरच चिंतनाचाही विषय झाला आहे. महिलांच्या कायद्याची जाणीवजागृती देण्याचे काम माध्यमातून होणे गरजेचे आहे. महिलांकडे वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अत्याचार झाल्यानंतर महिला समाजात बदनामी होऊ नये म्हणून तक्रार देण्याचे टाळतात. अशा अनेक घटनाना राजकीय रंग दिला जातो. त्यामुळे पिडित महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदल...

विकास सबनीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!

Image
तब्बल पन्नास वर्षे व्यगंचित्रकलेची अव्याहतपणे सेवा करत त्यांनी राजकीय व्यंग हेच आपली शैली म्हणून विकसित केली ... राजकीय व्यंग अचूकपणे हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं कल रात्री दहाच्या सुमारास मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं ... ते ६९ वर्षांचे होते... विकास सबनीस गेला आठवडाभर रुग्णालयात उपचार घेत होते.... अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले  होतं ... मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं ... त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले ... सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकीर्दीला यंदाच ५० वर्षे पूर्ण झाली होती... त्यानिमित्त २० फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात आयोजित 'रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची' या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता... १९६८ पासून अव्याहतपणे त्यांनी व्यंगचित्रकलेची साधना केली... टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर. के. लक्ष्मण यांची आणि मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे पाहून ते प्रभावित झाले... बाळासाहेब ठाकरे...

अनुराधा पाटील यांची मानवतेच्या कळकळीची कविता - यशवंत भंडारे

Image
औरंगाबादच्या अनुराधा पाटील यांच्या “ कदाचित अजूनही ” या काव्यसंग्राहाची साहित्य अकादमीनं पुरस्कारासाठी निवड केली आहे. अनुराधा पाटील यांच्या कविता चिंतनात्मक आहेत. स्त्रियांच्या भावना अन् जाणीवा त्या हळुवारपणे मांडतात. त्यांच्या कविता स्वत:ची वाट शोधताना दिसतात. त्यांची कविता स्त्रियांच्या जीवनातील दु:खाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्याय शोधताना दिसते.अनुराधा पाटील यांचे 1981 ते 2005 या 24 वर्षांत चार कविता संग्रह प्रसिध्द झाले. त्या कविता संग्रहात 224 कवितांचा समावेश आहे.तर “ कदाचित अजूनही ” काव्यसंग्रहात 51 कविता आहेत. कवितांच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट शोधलीच त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रभाव   निर्णय केला. त्यांची प्रतिभा संपन्नता त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. त्याच प्रतिभेचा साहित्य अकादमीनं   2019 चा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यकृतींचा विचार करण्यात आला. ताम्र पत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश ...

कृतिशील समाजसुधारक : गाडगे महाराज

Image
गाडगे महाराज म्हटलं की हाती झाडू आणि सफाई असं चित्र डोळ्यासमोर येतं पण गाडगे महाराज यांनी जमिनीवरील सफाईबरोबरच माणसाच्या मनातील अंधश्रद्धा , कालबाह्य रूढी - परंपरा , चालीरीती , जातीभेद यांवर प्रहार करतानाच वैज्ञानिक दृष्टिकोनही समाजात रुजवण्याचा प्रयन्त केला ... त्यांची सवांद शैली श्रोत्यांच्या मनाला थेट साद घालणारी होती ...दैनंदिन व्यवहारातील वैगुण्यावर नेमकेपणानं बोट ठेऊन त्यातील खोटेपणा ते सहजपणे दाखवून देतं ...त्यामुळं त्यांचे अनेक भक्त झाले पण गाडगेबाबा आजच्या बजबजपुरीतील भोंदू बाबा सारखे नव्हते ... ते स्वतः चा बडेजावपणा वाढवून भक्तांना लुटणारे धर्माचा बाजार माडणाऱ्यापैकीही नव्हते ...उलट दगडातील देवा पेक्षा माणसातील देवाला अन देवळातील देवा पेक्षा चालत्याबोलत्या माणसाच्या कल्याणाचा ...त्याच्या सर्वांगीण विकासासाठी , त्याच्या सुखासाठी ,त्याच्या शिक्षण आणि आरोग्याससाठी काम करण्याचा आग्रह ते अधिक धरत असतं ...ते दरवर्षी पंढरपुरात आषाढी वारीला जात पण लोकांनी केलेली घाण साफ करत ...विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा त्यांनी स्वच्छतेत देव शिधला ...कुणास पाया पडू दिले नाह...

तत्वज्ञ अभिनेता : डॉ.श्रीराम लागू

Image
अभिनेता श्रीराम लागू यांचं आज (दिनांक 17 डिसेंबर, 2019) वृध्दापकाळानं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.त्यांचं पार्थिव दिनानाथ मंगेशकर  रुग्णालयात उद्या (दि.18 डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी आज धडकली अन् एका खऱ्या नटसम्राटाला श्वासोश्वासाच्या जंजाळ्यातून निसर्गानं मुक्त केलं. विज्ञानावर नितांत निष्ठा ठेवून त्या बरहुकुम जगलेल्या आणि अंधश्रध्देवर प्रहार करत विवेकनिष्ठ समाज घडावा म्हणून प्रयत्न करणारा माणूस आपल्यातून आज गेला आहे….. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली…..!!! पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना डॉ. लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भालबा केळकर यांच्यासारख्या  समविचारी वरिष्ठ स्नेही समवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरु केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं आणि पुण्यात पाच वर्षे कामही केलं. त्यानंतर कॅनडा आणि इंगलंड येथे पुढील प्रशिक्षण घेतलं. 1960 च्या दशकात डॉ.लागू य...