Posts

Showing posts from November, 2019

ग . त्र्यं . माडखोलकर यांना विनम्र अभिवादन .... !!!

Image
मराठी साहित्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ,लेखक ,कवी , पत्रकार आणि समीक्षक आशा विविध अंगी लेखनान मराठी भाषा समृद्ध करणारे गजानन त्र्यंबक माडखोलकर यांची आज पुण्यतिथी... प्रथम त्यांना अभिवादन ...!!! आपल्या खास भाषा वैभवामुळे माडखोलकर मराठी जगतात परिचित होते ...मी महाविद्यालयात असताना त्याचं मिळेल तेव्हडे साहित्य वाचलं ... त्यांच्या लयदार , भरदार आणि प्रसंगाच चित्रण खास पद्धतीनं करण्याच्या शैलीमुळ ते त्यांच्या लेखनाच्या प्रे मात वाचकांना पाडत असतं ...मराठी आणि स्वस्कृत कविता करत - करत त्यांनी मराठी साहित्यात विविध साहित्य प्रकार हाताळले ... ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते ... रविकिरण मंडळाने १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या " उषा " या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या ... बेळगाव येथे १९४६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ... कर्नाटकातील या संमेलनात त्यांनी कर्नाटकीच्या नाकावर टिचून मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा असा प्रथमच ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला... इटली आणि आर्यलँडच्या इतियाचा त्यांनी अभ्यास केला ...

महात्मा फुले यांना : कोटी कोटी नमन ...!!!

Image
आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला आहे ... त्याच्या परिवर्तनाचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले ... भारतात सर्वाधिक समाजसुधारक महाराष्ट्रातील होते ... देशाला समाजसुधारणेची प्रेरणाच मुळात महाराष्ट्रातील समाज सुधारकांची आहे ... त्यांचा हा वारसा त्यांच्या ग्रंथांद्वारे आजही आपणास मार्गदर्शक ठरतो आहे ... या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे अग्रगण्य आहेत . .. ते खऱ्या अर्थानं क्रांतीसुर्य होतं ... त्यांची दुसरी ओळख मराठी भाषेतील लेखक , कवी , नाटककार , उद्योजक , शास्त्रज्ञ शेतकरी , विचारवंत , बांधकाम व्यावसायिक , शिक्षण तज्ज्ञ , स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे पाहिले नेते , स्पृश्यशाचे उद्धारक अश्या कितीतरी विशेषणांनी करून देता येईल ... " सत्यशोधक समाज " संस्थेची स्थापना करून त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली ... महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्व प्रथम स्त्री आणि अस्पृशांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली... जनतेने त्यांना मुंबईतील एका मोठ्या समारंभ...

भारतरत्न जे आर डी यांना अभिवादन....!!!

Image
भारतीय उद्योग जगातील संसमर्णीय व्यक्तिमत्व ... सामाजिक बांधिलकी आणि दाततृत्वाची जाण अन भान असलेले उद्योगपती ... याची झलक त्यांनी निर्माण केलेल्या संस्थातून व्यक्त होत ...ते म्हणजे टाटा समाज विज्ञान संस्था ...टाटा मूलभूत संशोधन संस्था ...आणि आशियातील पहिलें कर्करोग रुग्णालय याची त्यांनी केलेली स्थापना ...त्यांनी मानवतेच्या सेवेची मंदिर बांधली पण अंधश्रद्धेच्या नादी लावणारी नाही...त्यांनी सातत्यानं भारतीतील नागरिकांच्या गरजांचा , त्यांना  आवश्यक असणाऱ्या सुविधांचा विचार केला ...ज्या देशात सुई निर्माण होत नव्हती त्या देशातील नागरिकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी 1945 मध्ये टेल्को ची सुरुवात केली ... टेल्को हे जेआरडी याचं अभियांत्रिकी सेवेच्या माध्यमातून नावं तंत्रज्ञान , नवं निर्मिती अन भारताच्या स्वप्न पूर्ततेसाठी उचललेलं पाऊलं होतं ... सर्व वस्तू आणि सेवा भारतीयांना भारतातच उत्पादित करून त्यांचा पुरवठा करण्याचे त्यांनी प्रयत्न केले ...त्यामुळे आज आपण अनेक बाबीत स्वयंपूर्ण होत आहोत ... भारतात विमान सेवा , लोह उद्योग , हॉटेल , मोटार गाड्या ते दररोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक व...