Posts

लोकशाही , समतेचे कट्टर पुरस्कर्ते .... महात्माबसवेश्वर

Image
 लोकशाही , समतेचे  कट्टर पुरस्कर्ते  'महात्माबसवेश्वर ' महात्मा बसवेश्वर महाराज  हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक  होते... त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध बंड पुकारून त्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला... त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला...  शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५  मध्ये अक्षय तृतीयला प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला... काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा...  त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते...   त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते...  त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या... बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा होते ...  बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत...  त्यांनी वयाच्...

अनागरिक धर्मपाल यांना विनम्र अभिवादन...!!!

Image
     अनागरिक धर्मपाल  यांचा आज 91 वा स्मृति दिन ...                                बौद्धिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या वर्षी म्हणजे 1891 मध्ये 20 जानेवारी रोजी सारनाथला  धर्मपाल यांनी भेट दिली... त्यांची ही  भारतातील  बौद्ध स्थळांना भेट देण्याची पहिली वेळ होती... त्यापूर्वी त्यांनी एकदा  भरतात भेट दिली होती पण तेव्हा त्यांनी बौद्ध स्थळांना भेट दिली नव्हती... 22 जानेवारी 1891 रोजी त्यांनी बुद्धगयेस भेट दिली... त्यावेळी ज्या स्थानावर तथागतास बुद्धत्व प्राप्त केले,  जे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचे ठिकाण आहे तेथील बुद्ध  विहारावर शैव धर्मियांचे स्वामित्व आणि बौद्ध धम्माच्या विरुद्ध असलेली पूजापाठ पाहून त्यांचे हृदय खेद,  चिंता, उद्वेग आणि दुःखाने व्यग्र झाले.... महाबोधी महा विहाराची दयनीय अवस्था झाली होती... बोधी वृक्षांचीही  अत्यंत वाईट अवस्था झाली होती... गेल्या फेब्रुवारी 2025 पासून  बुद्धगया येथे जे महाबोधी मह...

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

Image
   जयंतीनिमित्त   संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट                  --- यशवंत कि.  भंडारे   सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव.... त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही... मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं आहे... गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनीच ...गझलेच्या सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला...‘लाभले आम्हास भाग्य’  या त्यांच्या गझलनं मराठी माणसाच्या  मनात खास जागा निर्माण केलीय..,       त्यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी...  गझल यांचा आयुष्यभर मनापासून अध्ययन केलं ... गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला...त्यामुळं मराठी भाषिकांचे ते खरे खुरे ‘गझल सम्राट’  झाले ... विदर्भातील अमरावती  शहरात सुरेश भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी झाला... तिथेच ते लहानाचे मोठे झाले... वडील डॉक्टर असल्यान  घरची आर्थिक परिस्थीती चांगली  होती...  आईला कवितेची खूप आवड होती... यातूनच सुरेश भट कवितेकड...

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

Image
बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध  - यशवंत भंडारे                          हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य समाज हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मियांकडून नाडला गेला होता. सबंध देशात ब्रिटिश कालावधीत समाज सुधारणेचे वारे वाहत असताना हैदराबाद संस्थानात मात्र समाज सुधारणेची थोडी झुळूकही येत नव्हती. छोटे छोटे प्रयत्न होत होते. पण ते सबंध हैदराबाद संस्थानात नव्हते. बाबासाहेबांनी या प्रदेशातील जातवास्तव अनुभवल्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानासह मराठवाड्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी मराठवाड्याला लळा लावला. दोन परिषदा घेऊन सर्वार्थानं संपूर्ण परिवर्तनाला चालना दिली. त्याचा वेध घेणारा हा लेख बाबासाहेबांच्या जयंतीमिनित्त देत आहोत...   आधुनिक महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण महात्मा जोतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक, कृतिशील कार्यातून व बांधिलकीतून झाली. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीनं आधुनिक महाराष्ट्रामध्ये सामाजिक, धार्मिक ...

स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान

 महापरिनिर्वाण दिनानिमत्त स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान  - यशवंत भंडारे, लातूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे साधन आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे. मानवी साधन सामग्रीचा वापर सुयोग्य पध्दतीने करावयाचा असेल तर जात आणि धर्माच्या साखळ दंडानी जखडून ठेवलेल्या मानवी साधन सामग्रीला मुक्त केले पाहिजे, धार्मिक-सांस्कृतिक साखळ दंड उद्ध्वस्त केले पाहिजे. कायद्यापुढील समानतेच्या सुत्रांची काटेकोर अंमलबजावणी करुन देशाच्या समृध्दतेला गती दिली गेली पाहिजे. सामाजिक समतेबरोबरच संधीची समानता निर्माण केली पाहिजे. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, संधीची समानताही आणावी लागेल. असा आग्रह धरुन केवळ न...

डॉ नागनाथ कोत्तपल्ले परिवर्तनवादी लेखक

Image
 #डॉनागनाथकोत्तापल्ले : पुरोगामी , परिवर्तनवादी सामाजिक जाणिवेचे  लेखक - समीक्षक यांना  विनम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली... मराठी साहित्य नि सारस्वतात 1960 नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्‍या प्रा डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दुपारी निधन  झाल्याची बातमी मी आज बिलोली येथे असताना समाज माध्यमातून कळली ... तशी ही बातमी खरी नसवी मनोमन वाटत असल्यानं पुण्यातील साहित्यिक वर्तुळातील मित्रांना फोन करून कन्फर्म केलं असता ही बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालं ... काल  त्यांच्या चिरंजीवणी सरांची प्रकृती गंभीर असल्याचं साहितलं होतं पण सर खूप लढवय्या असल्यानं बाहेर येतील असंही वाटतं होतं पण ही आशा फोल ठरली...  सरांचं महाविद्यालयीन शिक्षण नांदेड जिल्ह्यातील  देगलूर येथे झालं होतं ... तर  पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथील पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ नि आताचं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं होतं ...  ...

डॉ रावसाहेब कसबे

 प्रसिद्ध विचारवंत प्रा .डॉ . रावसाहेब कसबे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा  प्रज्ञावन्त विरवंत : #डॉरावसाहेबकसबे प्रज्ञावंत विचारवंत नि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा .डॉ. रावसाहेब कसबे सर यांचा जन्म औरंगपूर ( ता.अकोले जि.अहमदनगर )12 नोव्हेंबर 1944 येथे झाला... त्यांच्या  वडिलांचे नाव  राणोजी तर  आईचं दगडाबाई ... वडील गावातील एक प्रतिष्ठित अलेले राणोजी हे गवंडी काम करतं ...  त्यांना गावातील  अस्पृश्य नि स्पृश्य वस्तीतील स्त्री-पुरुष त्यांना मान देतं असतं ...  ते गावातील वादात  निवाडे करत असतं ... गावातील  तंटे सोडवतही त्यांच्या शब्दास मान होता ...  परिणामी गावातील सर्व जाती -- धर्मांचे  लोक त्यांचा आदर करतं ... हे  सगळं असलं तरी अस्पृश्यतेचा मनःस्ताप  राणोजी यांना सहन करावा लागला ... तंटे , वादविवादात जो समाज त्यांच्या शब्दाचा सन्मान करायचा तोच समाज  त्यांना दुरूनच पाणी देत असे ... वेगळ्या ताटात ,वेगळे जेवण वाढत असे ... इतर अस्पृश्य  कुटुंबाप्रमाण राणोजी यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबी...